Nashik Marathwada News: जायकवाडीचा मृतसाठा वापरावा; जिल्हाधिकारी शर्मा यांचा गोदावरी महामंडळाकडे स्पष्ट अभिप्राय

 Jayakwadi nashik news
Jayakwadi nashik news esakal

Nashik Marathwada News : यंदा अपुरा पाऊस पडल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. अशा परिस्थितीत मराठवाडा व नाशिक-नगर असा पाण्याचा संघर्ष उभा राहिला आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या मृत साठ्यातून २०१५ मध्ये ०.५ टीएमसी पाणी वापरण्याची परवानगी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिली होती.

त्याचप्रमाणे मृत साठ्यातून २०१२, २०१५ व २०१८ मध्ये सुमारे दहा टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. याच मृत पाणीसाठ्याचा वापर पुन्हा केल्यास नाशिकमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे नोंदविला आहे. (Collector Sharma suggest Godavari Corporation to use dead water stock of Jayakwadi dam nashik news)

पाणी संघर्षात गोदावरी पाटबंधारे विभागाने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने तीव्र झालेल्या संघर्षात मराठवाड्यातील नेत्यांचा पाणी हिसकावून घेण्यासाठी आततायीपणा दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१२ व २०१५ मध्ये जायकवाडीचा मृत पाणीसाठा उचलला असताना नाशिकच्या पाचशे दशलक्ष घनफूट पाण्यासाठी दबाव आणला जात आहे.

यंदाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातच अपुरा पाऊस पडला. जवळपास ३० ते ३५ टक्क्यांची पाण्याची तूट निर्माण झाली. त्यामुळे काही धरणे फुल असली तरी बरीचशी धरणे निम्मीदेखील भरली नाहीत. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणासाठी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने पाण्याचे सूत्र ठरवून दिले आहे.

जायकवाडी धरणात पाण्याची ठराविक टक्केवारी असल्याने पाण्याचा कोटा पूर्ण करण्यासाठी नाशिक व नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे सूत्र आहे. त्यानुसार नगरमधील निळवंडे धरणातून ८.६ टीएमसी, तर गंगापूर धरणातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परंतु या निर्णयाला उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली. गंगापूर धरणातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्यास आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विरोध केला आहे. पाणी सोडण्यास विरोध नाही, परंतु गंगापूर धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने दारणा धरणातून पाणी सोडावे, अशी त्यांची मागणी आहे. या विरोधात उच्च न्यायालयात धावदेखील घेण्यात आली आहे. ५ डिसेंबर २०२३ ला न्यायालयात पुन्हा सुनावणी आहे.

 Jayakwadi nashik news
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

आदेश दाबल्याने संशय

निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात दाखल हस्तक्षेप याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जायकवाडीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परंतु यापूर्वीदेखील टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना मृत साठ्यातून पाणी उपसण्यास परवानगी असताना नाशिक व नगरच्या पाण्यासाठी हट्ट व गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाकडून पाणी सोडण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यात आल्याने गोदावरी पाटबंधारे विभागाने २०१२ व १५ मधील आदेश दाबून ठेवण्यावर संशय व्यक्त होत आहे.

पाणी जपून का वापरले नाही?

‘अल निनो’ वादळामुळे राज्य शासनाने पाणी जपून वापरण्याचे पत्र स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. नाशिक महापालिकेकडून पाणी जपून वापरण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले.

परंतु छत्रपती संभाजीनगर महापालिका, तसेच जायकवाडी धरणावरील पालिकांनी पत्रानुसार कारवाई न करता नियमित पाण्याचा उपसा चालूच ठेवला. राज्य शासनाचे पत्र राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असताना संभाजीनगर महापालिकेने त्याचवेळी पाणी जपून का वापरले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 Jayakwadi nashik news
Jayakwadi Dam: "जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला"; हायकोर्टाचा सरकारला सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com