Funding
sakal
नाशिक: जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांचा गेल्या आर्थिक वर्षातील ३४० कोटींच्या दायित्वापैकी केवळ ८० कोटींचा निधी खर्च झाला. जिल्हा परिषदवगळता अन्य विभागांचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च न झाल्यास तो परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निधीचे योग्य नियोजन करीत वेळेत तो खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.