

Welfare Scheme in Limbo: Children Pay the Price for Grant Delays
Sakal
-प्रशांत कोतकर
नाशिक : राज्यात एकल मातांच्या पाल्यांसाठी आधार ठरणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे अनुदान महिनोन्महिने रखडल्याने हजारो कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. अनुदान वेळेवर न मिळाल्यामुळे मुलांचे शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजा भागवताना एकल मातांना अक्षरशः नातेवाइकांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.