Igatpuri News : इगतपुरीतील भातशेती पावसाने उद्ध्वस्त! दिवाळीत अवकाळीचे अस्मानी संकट; सरसकट नुकसानभरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी

Farmers Hit Hard by Continuous Rainfall Since Diwali : इगतपुरी तालुक्यात दिवाळीच्या काळात झालेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून पीक विमा कंपनीकडून सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार अभिजित बारावकर यांना निवेदन दिले.
NCP leaders

NCP leaders

sakal 

Updated on

इगतपुरी: इगतपुरी तालुक्यात दिवाळीपासून रोज होणाऱ्या पावसाने भातशेतीची मोठी हानी झाली असून, शेतकरी पुरता कोलमडला आहे. या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना कुठलाही नियम, अटी-शर्ती न लावता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके व तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अभिजित बारावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com