Indian wine industry
sakal
नाशिक: भारताच्या वाइन उद्योगाने महत्त्वाचा टप्पा गाठला असून, भारताची वाइनची राजधानी (वाइन कॅपिटल ऑफ इंडिया) असलेल्या नाशिकचे योगदान राहिले आहे. नाशिकमध्ये उत्पादित ‘करी फ्लेवर’ नावाने ओळखली जाणारी जांभूळ वाइन थेट अमेरिकेच्या बाजारपेठेत पोहोचली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच व्यावसायिक निर्यात असून, यामुळे भारतीय रानमेवा आणि आदिवासींच्या कष्टाला जागतिक ओळख मिळाली आहे.