Bachchu Kadu
sakal
खामखेडा: निवडणुकीवेळी मतांसाठी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू, असे आश्वासन देणाऱ्या सरकारला आता शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हीच सर्वांत मोठी शोकांतिका आहे. मला सरकार नव्हे, शेतकरी समस्या वाटत आहेत. शेतकरी एकत्र येत नाहीत, तोपर्यंत सरकार ठिकाणावर येणार नाही, असे सांगत त्यांनी सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचे आव्हान दिले.