
नाशिक : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये कोरोनाची महामारी पसरत चालली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे येथील कोरोना पॉझिटिव्ह संख्या ९ झाली. याशिवाय एकाचा मृत्यू झाला आहे. आज मध्यरात्री हा अहवाल आल्यावर सबंध प्रशासन खडबडून जागे झाले. सबंध शहर रात्रीच सील करण्यात आले. सबंध आरोग्य आणि पोलिस यंत्रणा रात्रभर जागी होती. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनी मध्यरात्री खास पत्रक काढले. गुरुवारी मालेगावच्या चाळीस नमुण्यांचे तपासणी प्राप्त झाले. यातील पाच पॉझिटिव्ह होते. यातील एक चांदवड येथील असून तो तबलीकी मरकजशी संबंधत आहे.या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मालेगाव उत्तरमध्ये सर्वाधिक रुग्ण
मालेगावमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. मालेगाव शहरात कोरोनाचे 5 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहेआता नाशिक शहर (१), निफाड (१), चांदवड (१) आणि मालेगाव (९) मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक रूग्ण असल्याने मालेगाव उत्तर महाराष्ट्राचे केंद्र बनले आहे. ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. मालेगांवात दुर्देवाने कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. नऊ असुन काल रात्री सलग दुस-या दिवशी आणखी पाच पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. जीवन हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधितांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. आता शहरात व जिल्ह्यातही माणसाचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे.
यंत्रणेची उडाली झोप
सलग दुस-या दिवशी पाच जण पाॅझिटिव्ह आढळले. काल दिवसभर शहराचा एक भाग सील केला होता. स्वतः कृषीमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि सर्व वरिष्ठ मालेगावात तळ ठोकून होते. रात्रीचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंध यंत्रणेची झोप उडाली. सबंध शहर रात्रीच सील करण्याचे काम सुरू करण्यात आले.
हेही वाचा > #Lockdown : 'लॉकडाउन'च्या अंधारावर उमटली चार चिमुकली पावले...'ते' देवदूतासारखे धावले मदतीला!
४०० जणांच्या टीमकडून संशयितांचा शोध सुरु
जिल्हाधिकारी सूरज मांढरे व कृषी मंत्री दादा भुसे गुरूवारी मालेगांव मध्ये होते. ४०० जणांची टीम संशयितांना शोध घेत आहे. बाधित लोक जेथे होते त्या भागातील लोकांची चाचणी केली जाईल. व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. ती व्यक्ती कोठून प्रवास करुन आली असे काही सुन येत नाही. त्यामुळे चिंतेची बाब आहे. लोकांमध्ये हा कोरोना इकडुन तिकडे पसरला आहे की काय? असा प्रश्न आहे. अशा ठिकाणी संचारबंदी अधिक कडक केली जाईल. त्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. लोकांचा जीव वाचविण्यासाठी प्रशासनास हा निर्णय घ्यावा लागत आहे. आपण त्यास सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.