Nashik’s Development
sakal
शहर व परिसराचा विकास करायचा असले तर त्यासाठी निधीची आवश्यकता असते. अर्थात पैशाशिवाय कामे होत नाही. परंतु सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जवळपास २५ हजार कोटींच्या कामांना नारळ वर्षाअखेर वाढविल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. या वर्षात ही सर्वांत मोठी उपलब्धी ठरेल. वाढवण पोर्ट, समृद्धी महामार्गाचा सुरू झालेला तिसरा फेज व घोटी ते वाढवण महामार्गाला मिळालेली मंजुरी, बाह्यवळण रस्त्याला मान्यता या बाबी विकासाचा वेग चारपटीने वाढविणारा ठरणार आहेत.