Declining rainy days impact on Nashik agriculture
esakal
येवला : नाशिक जिल्ह्यात पावसाचे वार्षिक आकडे स्थिर अन काही ठिकाणी वाढतेही दिसत असले, तरी पावसाचे दिवस मात्र सतत कमी होत असल्याची चिंताजनक स्थिती (Nashik rainfall) आहे. कमी दिवसांत मुसळधार स्वरूपात होणारा पाऊस हा जमिनीला, पिकांना आणि शेतीच्या नियोजनाला पुरेसा लाभदायक ठरत नाही. यामुळे पिकांच्या वाढीच्या चक्रात अनियमितता निर्माण होत असून, अंकुरण्यापासून ते उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर परिणाम जाणवू लागला आहे.