जळगाव- ‘‘विरोधात राहण्याची कुणाची इच्छा नाही, सत्तेशिवाय ही मंडळी राहू शकत नाही अशी आजची स्थिती आहे. आमच्यासह मित्रपक्षांमधून सत्ताधारी पक्षांमध्ये अनेक नेते गेले आणि अनेकांची रिघ लागली आहे. ही गर्दी केवळ स्वार्थासाठी जाते. पण, लोकशाहीत राज्यांमध्ये अथवा केंद्रातही विरोधकांचा हिस्सा ५० टक्क्यांहून अधिकच असतो. त्यामुळे सत्तेकडे जाणाऱ्या स्वार्थी लोकांमुळे आमच्या पक्षात नव्या नेत्यांसह कार्यकर्त्यांसाठी मोठी जागा निर्माण होत आहे,’’ असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.