'तो' कायदा आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील - राज ठाकरे

raj thackeray
raj thackerayesakal

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) नाशिकमध्ये आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. राज ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन नव्या शाखाध्यक्षांची नावे जाहीर केली. तर नाशिक पालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अमित ठाकरेही नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली (ता.२३) यावेळी त्यांनी राज्य सरकारसह अनेक मुद्द्यांवर टिका केली आहे.

''शरियतसारखा कायदा आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील

राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने घडत आहेत. अत्याचारांचे हे सत्र अद्याप सुरूच आहे. मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला होता. महिलांच्या वाढत्या अत्याचारावर राज ठाकरे बरसले आहेत. ते म्हणाले ''शरियतसारखा कायदा आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील असे ते म्हणाले.

raj thackeray
मनसेत पदोन्नती की पदावनती? शाखाध्यक्ष मेळाव्यातील यादी

उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का? राज ठाकरेंची घणाघाती टीका

बहुसदस्यीय प्रभागपद्धतीवर मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी कडाडून टीका केली आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. "यापूर्वी पाच वर्षापूर्वी मी बोललो होतो. पुन्हा एकदा सांगतो, २०१२ ला पहिल्यांदा (ncp) राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचं सरकार होतं. एक उमेदवार होता प्रभाग नावाची गोष्ट नव्हती. (Bjp) भाजपा-शिवसेना सरकारने चारचा प्रभाग केला. निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला, एक उमेदवार पाहिजे. काल त्यांनी तीनचा प्रभाग करायच ठरवलं. मुळात अशी देशात कुठेही पद्धत नाही. कायद्याने बघितलं तर अशी प्रभागपद्धती अस्तित्वात नाही" असे राज ठाकरे म्हणाले.

raj thackeray
नाशिकचा कांदा वेगळ्या प्रयोगांतून चर्चेत! शेतकऱ्याचा प्रयोग

महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी हे सर्व सुरु

"महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी हे सर्व सुरु आहे. आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करुन, पैसा ओतून निवडणूक जिंकणे हा उद्देश आहे" अशी टीका राज ठाकरेंनी केली. "लोकांनी हा त्रास का सहन करायचा. तीन उमेदवारांना मतदान का करायचं? लोकांना गृहित धरायचं, आपल्याला हवे ते प्रभाग करायचे. हे कायदेशीर नाही निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे" असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

"देशाचा आणि महाराष्ट्राचा कायदा वेगळा आहे का? दोन-तीन चार प्रभाग काय खेळ सुरु आहे. उद्या तीन आमदारांचा एक प्रभाग करणार का? ग्राम पंचायतीला हे चालत नाही आणि महापालिकेला प्रभाग पद्धत. लोकांनी या विरोधात कोर्टात, निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे. निवडणुकीची थट्टा करुन ठेवली आहे" अशी टीका राज ठाकरेंनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com