नाशिक : कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनाबाबत राज्यातील परिस्थिती जास्त खराब आहे. राज्य सरकारने परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले. योग्य नियोजन केले नाही असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट दिली. आठवले यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. तेथील घटनेची माहिती घेतली. संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आरोप करण्यापेक्षा उपचाराचा दिलासा द्या - आठवले
आठवले म्हणाले की, नाशिकची घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. पाठोपाठ आज विरारची घटनाही धक्कादायक आहे. माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन आहे की, त्यांनी या दोन्ही घटनांची चौकशी करावी, या घटनेतील दोषींना शासन करावे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कोरोना बाधीतांच्या कुटुंबाना योग्य नातेवाईकांना मिळावी ही अपेक्षा आहे.
विनाकारण केंद्रावर आरोप करण्यापेक्षा रुग्णांना दिलासा द्या
खासदार आठवले म्हणाले की, राज्यसरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. राज्यातील मंत्र्यांनी विनाकारण केंद्रावर आरोप करण्यापेक्षा राज्यातील रुग्णांना कसा दिलासा देता येईल हा प्रयत्न करावा. राज्यसरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य नियोजन केलं नाही. केंद्राचे हातपाय पडण्याची गरज नाही, नियोजन करा, लोकांना दिलासा द्यावा कोरोना नियंत्रणासाठी केंद्रसरकारही उपाययोजना करतंय असही स्पष्ट केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.