Ring Road Project
sakal
नाशिक: शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी २५ गावांतील शेतकऱ्यांनी पुढे सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण, काही गावांनी महामार्गाचे संरेखन बदलासाठी थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना साद घातली. परंतु, महामार्गाची उभारणी करणारी यंत्रणा एमएसआयडीसी असल्याने त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे संरेखन बदलासाठी शेतकऱ्यांवर आता मुंबईतील एमएसआयडीसीएलचे मुख्यालय गाठण्याची वेळ ओढावली आहे.