SAKAL Impact : हरसूलपासून दहा किलोमीटर अंतरावरील तोरंगणपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथील दीड ते दोन हजार लोकवस्तीच्या हनुमान मंदिरासमोर चौदाशे शतकानंतरच्या वीस आदिवासी चिरा दुर्लक्षित असल्याचे वृत्त ‘सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते.
त्यानंतर स्थानिक आदिवासींनी एकत्र येत वीस चिरांचे स्मारक उभारले आहे. त्यासाठी पेसा निधीचा उपयोग करण्यात आला. (SAKAL Impact Memorial made by Chira on Torangan Pada! Conservation of 20 Chiras of Fourteen Centuries nashik)
ठाणापाडाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला खैराईगड शिवकाळात मोघलांच्या ताब्यात होता. १६७६ मध्ये रामनगरचा भूभाग जिंकताना महाराजांनी खैराई किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला.
महाराज खैराई गडावर जाताना विजयाचे तोरण बांधले होते म्हणून पाड्याला तोरंगण असे नाव पडले असे सांगितले जाते. तोरंगणपाड्याच्या आदिवासी बांधवांनी चिरांना एका ठिकाणी आणून स्मारक उभे केले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या चिरांचा संबंध खैराई गडाच्या इतिहासाशी जोडला जाण्याची शक्यता आहे. कारण पूर्वी हा परिसर कोळी राज्याच्या ताब्यात होता. परिसरात या समाजाची अनेक घरे आहेत.
दरम्यान, चिरांमधून राज्यातील शूरवीरांचा इतिहास समोर येण्यास मदत होणार असून त्यासाठी चिरांचे संरक्षण करण्यासोबत त्यांचे ‘डॉक्युमेंटेशन' आवश्यक बनल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
"आमच्या गावात वीस चिरा आहेत. त्या दुर्लक्षित होत्या. अनेक चिरा मातीच्या ढिगाऱ्यात बुजून गेल्या होत्या. ‘सकाळ'मध्ये या चिरांविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यावर आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र आलो. पेसा निधीमधून आम्ही येथे स्मारक तयार केले. त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले."
- राहुल बोरसे (सरपंच)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.