Gharkul Yojana
sakal
नाशिक: शासकीय योजनेतून घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्याकडे जागा नसल्यास त्याला जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी व तहसीलदारांची आहे. जमिनीचा आदेश पारित झाल्यानंतरही सातबारा किंवा ८ (अ) उतारा व जागेचा ताबा मिळाला नाही, तर पोलिस बंदोबस्तात कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.