Sharad Pawar : राज्याची सामाजिक वीण विस्कटली: शरद पवार: 'सामाजिक ऐक्याबाबत तडजोड करणार नाही'

Social unity in Maharashtra under threat: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत उदासीन असल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही. कांदा निर्यातीबाबत ठोस धोरण या सरकारला ठरविता आलेले नाही. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करतो, तंत्रज्ञानाचा वापर करतो.
Sharad Pawar
Sharad Pawar

sakal

Updated on

नाशिक : ‘‘राज्य सरकारने आरक्षणाच्या बाबतीत स्वतंत्र समित्या स्थापन करून त्यावर विशिष्ट लोक घेतले आहेत. सरकार हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे असावे. परंतु, या सरकारला आरक्षणाचा प्रश्‍न सोडवायचा नसून तेढ वाढवायची आहे. यातून महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली जात असून एका समाजाचे लोक आता दुसऱ्या समाजाच्या घरी, दुकानात जात नाहीत, इथपर्यंत परिस्थिती खालावली आहे,’’ अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. सामाजिक ऐक्याबाबत आपण कधीच तडजोड करणार नसल्याचेही पवार म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com