Chandwad Farmer : कर्जाच्या ओझ्याने हैराण शेतकऱ्याने संपविले जीवन; शासकीय मदतीच्या प्रतीक्षेतच दिले प्राण!

Farmer Tragedy : शिंगवे गावातील शेतकरी बजरंग नरहरी मढे (वय ४८) यांनी कर्जाच्या ताणामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे जीवनाचा शेवट केला. त्यांनी घराशेजारील बैलगोठ्यात गळफास घेत आपले जीवन संपवलं.
Chandwad Farmer Ends Life After Crop Loss and Financial Stress

Chandwad Farmer Ends Life After Crop Loss and Financial Stress

Sakal

Updated on

गेल्या काही वर्षांपासून कोरडा आणि ओला दुष्काळ या दुहेरी संकटामुळे मढे यांची शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती. उत्पादन खर्चही न निघाल्याने वडिलांच्या नावे असलेले सोसायटीचे कर्ज फेडणे अशक्य झाले. दोन मुलींचे लग्न करण्यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे उभे केले, तर २०२३-२४ आर्थिक वर्षात शासकीय योजनेतून मंजूर झालेला बैलगोठा बांधण्यासाठीही हातउसनी पैसे घेतले.

Chandwad Farmer Ends Life After Crop Loss and Financial Stress
Amravati News: तीन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी संपवले जीवन; अमरावतीत महिला शेतकऱ्याने घेतला घरीच गळफास
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com