

Maharashtra Tribal Hostel Food Cut Sparks Protest Warning As Deepika Chavan Demands Better Nutrition For Students
esakal
-रोशन खैरनार
सटाणा : आदिवासी विकास विभागांतर्गत वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहाराचे प्रमाण २५० ग्रॅमवरून २०० ग्रॅम करण्याचा शासनाचा निर्णय म्हणजे ‘दात कोरून पोत भरण्याचा प्रकार’ असून, विद्यार्थ्यांना कुपोषित ठेवण्याचा हा प्रकार असल्याची टीका करत हा तुघलकी निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा संतप्त इशारा बागलाणच्या माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दिपिका चव्हाण यांनी दिला आहे.