Ranganath Pathare
sakal
नाशिक: सध्या भाषेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मुळात एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाण्यास फार जड जात नाही, पण आपल्याकडे भाषांनाही धर्माचा रंग देण्यात आला आहे. उर्दू भाषा म्हटले, की मुस्लिम धर्म डोळ्यांसमोर येतो. अमुक शब्द या धर्माचा आहे. या विचारधारेतूनच शब्दांना धर्माच्या माध्यमातून चिकटवले गेले. त्यामुळे भाषेला धर्म न चिकटविता भाषा टिकविणे व तिचा उजागर करणे महत्त्वाचे असल्याचे विचार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी मांडले.