अवकाळीमुळे रब्बीचे शेतकरी चितांतूर; गहू, हरभरा, वाल मसुरासह पालेभाज्यावर परिणाम 

Unseasonal rains have raised concerns among farmers
Unseasonal rains have raised concerns among farmers

खेडभैरव (नाशिक) : इगतपुरी तालुक्यासह पूर्व भागातील पिंपळगाव मोर, टाकेद, खेड, धामणी, धामणगाव, अधरवड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदलाचा परिणाम पिकांवर झाला आहे. रविवारी रात्री व सोमवारी परिसरात पावसामुळे पेरणी झालेल्या हरभरा, गहू, वाल, मसूर लागवडीसह टोमॅटो, वांगी आदी भाजीपाला पिकांवर ढगाळ वातावरणाचा व अवकाळीचा प्रतिकूल परिणामाच्या शेतकरी चिंतेत आहे. 

रब्बीवर परिणाम 

परतीच्या पावसाळी झालेल्या प्रचंड अवकाळी पावसामुळे मुख्य भात पिकाचे नुकसान होऊन रब्बीची पेरणीही लांबली होती. अशाही अडचणीत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तर काही ठिकाणी शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांना पाउस, ढगाळ वातारणामुळे अजूनही पेरणी लांबणार आहे. तर पेरणी होऊन उगवलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होती आहे. 

- वाफसा गेल्याने भाजीपाला लागवड उशीरा 
- रब्बी पिकांच्या लागवडीसाठी उशीर होणार 
- शेतकऱ्यांनी तयार केलेली रोपे वाया जाणार 
- जनावरांचा चारा भिजल्याने मोठे नुकसान 

दोन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पेरणी केलेल्या रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असून जमिनीतला वाफसा उडाल्याने भाजीपाला पीके लागवडीसाठी उशीर होणार आहे. रोपे वाया जाणार आहेत. 
- भगवान पारधी,शेतकरी, खेडभैरव ता. इगतपुरी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com