
नाशिक : जून महिन्यात पावसाने (rain) दिलेली ओढ व गंगापूर धरणातील आरक्षित पाणीसाठा (Water storage) संपुष्टात येत असल्याने १५ जुलैला बैठक घेऊन पाणीकपातीचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. जुलै महिन्यात गंगापूर धरण ६५ टक्के भरल्याने शहरात आता पाणीकपात होणार नाही. (water crisis over city gone 65 percent water storage in Gangapur dam nashik Latest rain marathi News)
गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. मागील वर्षी गंगापूर धरणातून चार हजार, मुकणेतून १५००, तर दारणा धरणातून १०० असे एकूण ५, ६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला.
त्यानुसार गंगापूर धरणात २३, तर मुकणेत ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे १५ जुलैला पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेण्याचा निर्णय आयुक्त रमेश पवार यांनी घेतला होता. परंतु, १० ते १२ जुलै दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांची पातळी उंचावली.
जुलै महिन्यात गंगापूर धरण ६५ टक्के भरले जाते. त्याव्यतिरिक्त जमा होणारे पाणी नियमानुसार नदीपात्रात सोडावे लागते, तर सप्टेंबर महिन्यात ९५ टक्के धरण भरल्यानंतर उर्वरित पाणी सोडावे लागते. गंगापूर ६५ टक्के भरले, तर दारणा धरणाचा पाणीसाठा ७० टक्क्यापर्यंत पोचला आहे. मुकणेत ५१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपात टळली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.