विवाहिता विहिरीवर पाणी आणायला गेली अन् अनर्थ घडला...परिसरात हळहळ

kalyani 123.png
kalyani 123.png

नाशिक / चांदवड : शेतकरी महिला दुपारपर्यंत आपल्या शेतात काम करीत होती. दुपारी जेवणासाठी जवळच असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणायला गेली अन् अनर्थ घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

असा घडला प्रकार

महिलेचे नाव कल्याणी किरण गांगुर्डे असून, ही शेतकरी महिला दुपारपर्यंत आपल्या शेतात काम करीत होती. दुपारी जेवणासाठी जवळच असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणायला गेली अन् अनर्थ घडला.  विहिरीवर दोर बादलीच्या सहाय्याने पाणी ओढताना तिचा पाय घसरला. यामुळे तोल जाऊन ती विहिरीत पडली. तिला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडाली. त्यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने तिला विहिरीतून वर काढत तत्काळ मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने निमोण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेचा तपास चांदवड पोलिसांकडे

निमोण येथील तरुण शेतकरी महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेचा तपास चांदवड पोलिस करीत आहेत, तर घटनास्थळी पोलिस शिपाई उत्तम गोसावी यांनी पंचनामा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com