Grape Farmer
sakal
येवला: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची स्वप्नंच भिजवली आहेत. चार महिन्यांच्या मेहनतीनंतरही द्राक्षबागांना फुलोरा न लागल्याने, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची उमेद गळून पडली आहे. पाटोदा येथील शेतकरी सोमनाथ घोरपडे यांनी अखेर निराशेच्या भरात स्वतःच्या दोन एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवत निसर्गाच्या अन्यायाविरोधात टोकाचा निर्णय घेतला.