हळदीच्या दिवशीच नवरदेवाने भरले पाणी!

अजंग (ता. धुळे) - तीव्र टंचाईमुळे शांतीनगर भागात टॅंकर आल्यानंतर धावपळ करीत पाणी भरताना नवरदेव समाधान अहिरे व ग्रामस्थ.
अजंग (ता. धुळे) - तीव्र टंचाईमुळे शांतीनगर भागात टॅंकर आल्यानंतर धावपळ करीत पाणी भरताना नवरदेव समाधान अहिरे व ग्रामस्थ.

कुसुंबा - अजंग (ता. धुळे) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना स्वखर्चाने टॅंकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. सर्वांनाच पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.  बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव समाधान अहिरे यास पाणी भरण्यासाठी धावपळ करावी लागली. शांतीनगर भागात प्रशासनाने दिवसातून दोन टॅंकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.

अजंगमधील शांतिनगर भागात तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सार्वजनिक विहिरीने तळ गाठला आहे. नळांना पाणीच नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवसभरातून दोन- तीन टॅंकर येतात. शांतिनगर महामार्गालगत असल्याने अपघाताच्या शक्‍यतेमुळे महामार्ग ओलांडू पाणी भरू शकत नाहीत. शांतीनगरमध्ये टॅंकर पोहोचत नसल्याने ग्रामस्थ वर्गणी गोळा करून स्वखर्चाने पाण्याचे टॅंकर मागवून घ्यावे लागत आहे. 

समाधान गोपीचंद अहिरे याचा विवाह वाघरे (ता. पारोळा) येथील मनीषा हिच्याशी शांतीनगरात भागात नुकताच झाला. मात्र कुटुंबासह नवरदेवाला लग्नापेक्षा पाण्याची चिंता भेडसावत होती. ज्या दिवशी हळद त्या दिवशी अहिरे परिवाराने स्वखर्चाने पाण्याचा टॅंकर मागविला. अहिरे परिवाराला लग्नाच्या आनंदापेक्षा पाण्याची चिंता भेडसावत होती. टॅंकर आल्यानंतर नवरदेव समाधान याने पाणी भरावयाला सुरवात केली. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने शांतिनगर भागात टॅंकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com