नाशिक शहरात पाणीकपात कायम

Water-Supply
Water-Supply

नाशिक - गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार झाल्याने धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्याचा आधार घेत सोमवारी (ता. ८) विरोधी पक्षांनी महापौर रंजना भानसी यांच्याकडे पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. किमान आठ दिवसांतून एकदा करण्यात आलेले शटडाउन तरी खोलावे, या मागणीवर विरोधक ठाम राहिले; परंतु जोपर्यंत धरणात समाधानकारक साठा होत नाही, तोपर्यंत कपात कायम राहील, असा निर्वाळा महापौर भानसी यांनी दिला. दुसरीकडे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही कपात रद्द होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबक भागात शनिवार (ता. ६)पासून मुसळधार पाऊस झाल्याने शहराचे पाण्याचे संकट टळताना दिसत आहे. त्यापूर्वी म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी गंगापूर धरणातील पाण्याने न्यूनतम पातळी गाठल्याने प्रशासनाने पाणीकपात महत्त्वाची असल्याचा अहवाल महापौर रंजना भानसी यांना दिला होता. त्याआधारे महापौर भानसी यांनी ३० जूनपासून शहरात जेथे दोन वेळ पाणीपुरवठा होतो, तेथे एकवेळ पाणीकपात सुरू केली. त्यानंतरही पावसाने पाठ फिरविल्याने दर गुरुवारी शहरात संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद करण्यास सुरवात केली. 

आतापर्यंत सुमारे एक दशलक्ष घनफूट पाणी वाचले आहे. मात्र शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळीदेखील वाढली आहे. सध्या ४० टक्के धरण पाण्याने भरले आहे. त्याआधारे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, अपक्ष नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी महापौरांकडे पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. परंतु महापौरांनी मागणी फेटाळली. आता पाऊस पडत असला तरी पुन्हा ओढ दिल्यास पाणीटंचाई भासायला नको म्हणून जोपर्यंत समाधानकारक पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत कपात रद्द केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com