वाढत्या टँकर मागणीने हादरले जिल्हा प्रशासन!

yeola
yeola

येवला : जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईची स्थिती येथे असून यामुळे टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.मात्र यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस असतांना टँकरची मागणी एवढी अधिक का? या प्रश्नाने प्रशासन बुचकाल्यात पडले आहे. त्यातच सिन्नर सारखे टँकरमध्ये गैरप्रकार होऊ नये याची काळजी म्हणून कि काय तालुक्यातील टंचाईग्रस्त ४३ गावांमध्ये जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या पथकांमार्फत टंचाई व टँकरची पडताळणी करण्यात आली आहे.

साडेसाती नशिबीच पुजलेल्या येवल्यात आज मितीस ६४ गावे व वाड्यावस्त्याना तहान भागवन्यासाठी टँकरची गरज वेळ आली आहे.सध्या २९ गावे व ३ वाड्यांना दहा शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु नऊ गावांना मंजुरी मिळाली असून दिवसभरात ३७ खेपा होत आहेत.तर नऊ ठिकाणी टंकरला मंजुरी मिळाली आहे. तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे आकडेवारी सांगते. मात्र प्रत्यक्षात तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी आवर्षणप्रवण पूर्व भागात नोव्हेंबरपासूनच टँकरच्या पाण्याची गरज भासली आहे. विहिरी व जलस्त्रोत केव्हाच कोरडे पडल्याने उद्भवलेल्या टंचाईने नागरिकांची हाल होत असतानाच यावर एक मात्र पर्याय असलेल्या टँकरची मागणी वाढली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या वाढत्या संख्येसंदर्भात काळजी असल्याने या गावांची त्रयस्थ समितीमार्फत पडताळणी करून घेण्यात आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देवळा,मालेगाव,नाशिक व सिन्नर येथील तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी, लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच वरिष्ठ भूवैज्ञानिक या पाच जणांचा समावेश असलेल्या चार समिती तयार केल्या होता.यात देवळ्याच्या समितीने बारा,मालेगावच्या समितीने अकरा,नाशिकच्या समितीने बारा व सिन्नरच्या समितीने ८ गावची शुक्रवारी (ता.२७) पाहणी करून पाणीटंचाईची वास्तव स्थिती जाणून घेतली आहे. तसेच या संदर्भातचा अहवाल देखील समितीने दिला आहे.

या तेरा मुद्याची घेतली माहिती...
समितीने अनकाई, राजापूर, तांदूळवाडी, वाघाळे, कौटखेडे, तळवाडे, नायगव्हाण, हडपसावरगाव, भुलेगाव, रेंडाळे, धनकवाडी, देवदरी, बाळापुर, कुसुमाडी, चांदगाव, ममदापूर, खैरगव्हाण, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, खरवंडी, कासारखेडे, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, खिर्डीसाठे, लहित, गुजरखेडे, सोमठाणजोश, पांजरवाडी, खैरगव्हाण (गोपाळवाडी), सायगाव येथील महादेववाडी गोरखनगर, वसंतनगर, आडसुरेगाव, गारखेडे, नीळखेडे, देवठाण, गणेशपूर या गावासह ममदापूरतांडा वस्ती,पिंपळखुटे बुद्रुक
या गावात जात ग्रामस्थ तसेच पदाधिकार्यांशी देखील समिती सदस्यांनी चर्चा करून टंचाईची माहिती जाणून घेतली. विशेष करून गावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे का?,जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का?, अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती,सार्वजनिक विहिरींची स्थिती,खासगी विहिरींची स्थिती,हातपंपांची स्थिती,गावाच्या दीड किलोमीटर परिसरातील उपलब्ध पाण्याचे वास्तव,खाजगी वीहिर अधिग्रहण शक्य आहे का?, मागील वर्षी टँकरने पाणीपुरवठा केला होता काय?, मागील वर्षी टँकर नव्हता परंतु यावर्षी असेल तर त्याचे कारण काय आणि टँकरच्या आवश्यकतेविषयी अभिप्राय असे तेरा मुद्दे पडताळून तसा अहवाल या समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com