जागतिक आदिवासी अधिकार दिन रांची येथे होणार

जागतिक आदिवासी अधिकार दिन रांची येथे होणार

वणी (नाशिक) - आदिवासी समन्वय मंच भारत व संलग्न आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक आदिवासी अधिकार दिन रांची झारखंड येथे येत्या १३ सप्टेंबर २०१८ रोजी संपन्न होत आहे.         

या कार्यक्रमासाठी विविध राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक, कलावंत, सांस्कृतिक पथकासह हजारो आदिवासी बांधव उपस्थित राहणार आहेत.          

आदिवासींच्या (मुळनिवासी) संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासभेने १३ सप्टेंबर २००७ रोजी एक ठराव संमत केला ज्याद्वारे विश्वातील मूळनिवासींच्या (आदिवासी) संरक्षणासाठी ४६ कलमी अधिकार  घोषणापत्र तयार करण्यात आले. घोषणापत्रात मूळनिवासींचे (आदिवासी) अस्तित्व, कल्याण आणि विकासातील सातत्य बघता, मुळनिवासींचे (आदिवासींचे) काय काय अधिकार आहेत याबाबतीत आपल्या देशात खूपच अज्ञान असल्यामुळे आदिवासी बहुल भागातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन आदिवासी समन्वय मंच, भारत ची स्थापना केलेली आहे.  

आदिवासी कला, संस्कृती, ज्ञान, नैसर्गिक ठेवा, वारसा, इतिहास, जीवनशैली, जीवनमूल्ये, सादगी, सहकार्य, सहिष्णूता, भाषा, सहजीवन, समानता, स्वातंत्र्यता' बंधुता, स्वावलंबन, स्वाभिमान, प्रकृति संवर्धन/ संरक्षण, प्राणी मात्रांवरील दया, या सांस्कृतिक मुल्यांची  खरं तर विश्वाला गरज आहे. परंतु, जागतिकीकरण आणि नैसर्गिक चढाओढ, ग्लोबल वॉर्मिंग, कृत्रिम विकास मानवताच नष्ट करेल की काय असे भयावह संकट उभे राहिले आहे. म्हणून जागतिक स्तरावरील विचारवंतांनी मानव सभ्यता म्हणजे आदिवासी समुदाय व त्यांची जिवनशैली, नैसर्गिक ठेवा टिकवायला हवी. तरच विश्वातील मानव सभ्यता टिकेल असे संकेत दिले आहेत.  म्हणून  आदिवासी माणूस राहिला तरच मानव सभ्यता राहील अन्यथः मानवी सभ्यता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हे ओळखून संयुक्त  राष्ट्र संघटनेच्या आमसभेतील विचारवंतांनी ९ अॉगस्ट जागतिक मूळनिवासी दिन बरोबरच १३ सप्टेंबर २००७ रोजी जागतिक मुळनिवासी ( आदिवासी) घोषणा दिवस जाहिर केलेला आहे. यावर्षी १२ वा. मुळनिवासी (आदिवासी) अधिकार घोषणा दिवस रांचीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांची उपस्थित अ विविध सामाजिक , राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक संघटनेचे अध्यक्ष प्रा.अशोक बागुल यांनी केलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com