येवला मर्चन्टस् बँकेची सांपत्तिक स्थिती अतिशय उत्तम

येवला मर्चन्टस् बँकेची सांपत्तिक स्थिती अतिशय उत्तम

येवला - जिल्हयातील सर्वप्रथम स्थापन झालेली व हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेली दि येवला मर्चन्टस् को-ऑप बँकेची सांपत्तिक स्थिती अतिशय उत्तम आहे. विक्रमी ठेवी व त्यानुसार कर्जवाटप व वसुली देखील होत आहे. त्यामुळे बँकेचे ठेवीदार व ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपआपले व्यवहार बँकेशी सुरळीतपणे करावेत असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

नोटाबंदीच्या काळातही सुरळीत सेवा देणारी ही बँक सर्वसामान्य माणसाच्या विश्वासास पात्र ठरली आहे. व्यापारी, व्यावसायिक व सोने तारणातून सर्वसामान्यांसाठी ही बँक ७५ वर्ष सातत्याने अर्थवाहिनी ठरली आहे. मात्र सध्या बँकेच्या विश्वासार्हतेबाबत विघ्नसंतोषी लोक निरनिराळया अफवा पसरवत आहेत त्या निराधार असून वस्तुस्थितीला धरून नसल्याची माहिती संचालकांनी आज पत्रकार परीषदेत दिली.आज बँकेच्या ठेवी विक्रमी १२२ कोटी आहेत तर कर्जवाटप ९५ कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेची एकुण गुंतवणूक ४७ कोटींची असुन त्यापैकी केंद्र व राज्य सरकारच्या कर्ज रोख्यांमध्ये २६ कोटी ३२ लाख तर जिल्हा बँकेमध्ये २० कोटी ७१ लाख रूपयांच्या ठेवींमध्ये गुंतवणूक पुर्वीच केलेली आहे.जिल्हा बँकेचे व्यवहार सुरळीत होताच बँकेची गुंतवणूक मिळणार आहे.

बँकेच्या कारभारावर रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण असुन दरमहा सर्व माहिती पाठविली जाते.बँकेची २६ कोटी ३२ लाख गुंतवणूक ही रिझर्व बँकेच्या आदेशाने करण्यात आली असुन ती पुर्णपणे सुरक्षित आहे. कर्जवाटपापैकी ४० कोटी रूपयाचे कर्ज वाटप हे सोनेतारणावर दिलेले असुन ५५ कोटीचे सोने बँकेकडे असल्याने कर्ज पूर्णपणे सुरक्षित आहे. तर आडत व्यापारी, किराणा व्यापारी, छोटे उद्योजक व व्यापारी तसेच विणकर यांनाही सुमारे ३३ कोटीचे केलेले कर्जवाटप सुरक्षित कर्जे याप्रकारात मोडणारे आहे.शहरांमध्ये ज्या कर्ज प्रकरणांची चुकीची व दिशाभुल करणारी चर्चा होतेय पण बँकेने सुमारे 22 कोटी रूपयांची कर्जे प्रॉपर्टी लोन या सदरात दिलेली आहेत.कर्जदारांच्या स्थावर मिळकतींचे मुल्यांकन व रजिस्टर्ड गहाणखत करून पुरेशा तारणांवर कर्जवाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

-ठेवीदारांच्या १ लाख पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण
-बँकेचा भाग भांडवल व स्वनिधी २० कोटी ६९ लाख असून त्यावरून आर्थिक स्थैर्याची कल्पना येते.
-बँकेतील सर्व ठेवीदारांच्या ठेवी या पूर्णपणे सुरक्षित
-ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवुन न घाबरण्याचे आवाहन  
-ठेवी मुदतपूर्व तोडून व्याजाचे नुकसान करून घेवू नये
-बँकेशी आपले व्यवहार नियमित व सुरळीत ठेवावित
-विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com