UP Assembly Election Results : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झालेत. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीत काही गोष्टींची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. यापैकी एक विषय म्हणजे लखीमपूर खेरी. लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri) गेल्या वर्षी कारने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती.
उत्तर प्रदेशच्या पश्मिमेकडीला भागात असणाऱ्या लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेचे देशभरात गंभीर पडसाद उमटले. निघासन विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या टिकुनिया येथे केंद्रीय मंत्र अजय मिश्रा यांचे पुत्र अजय मिश्रा यांनी आपल्या कार खाली शेतकर्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेत काही शेतकरी आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचारात भाजप कार्यकर्ते मारले गेले होते. ज्यामध्ये भाजप कार्यकर्ते आणि शेतकर्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी असल्यानं त्याला अनेक महिने तुरुंगात काढावे लागले होते.
देशभरात या घटनेचे गंभीर पडसाद उमटले होते. अनेक दिवस शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती ते ठिकाण म्हणजे टिकुनिया. हा भाग निघासन विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. या जागेवर भाजपचे शशांक वर्मा यांनी मात्र जोरदार विजय मिळवला. तर समाजवादी पक्षाचे आरएस कुशवाह हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय बसपचे आरए उस्मानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
लखीमपूर खेरीमध्ये विधानसभेच्या एकूण आठ जागा आहेत. पालिया, निघासन, गोला, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कास्ता आणि मोहम्मदी. या आठही विधानसभेच्या जागा भाजपने जिंकल्या आहेत. लखीमपूर खेरी येथे चौथ्या टप्प्यात मतदान झालं. त्यावेळी 62.45 टक्के मतदान झालं होतं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.