राज्यातील एसीबीचा दबदबा झाला कमी; बरेच ट्रॅप झाले फेल; सर्रास होतोय भ्रष्टाचार 

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612863368783,"A":[{"A?":"I","A":54,"B":728.7513132607304,"D":161.47955787952236,"C":47.38684118046818,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B":{"B":2.842170
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612863368783,"A":[{"A?":"I","A":54,"B":728.7513132607304,"D":161.47955787952236,"C":47.38684118046818,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B":{"B":2.842170

नागपूर ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कामही थंडावल्याचे आकडेवारीवरुन पुढे आले आहे. गेल्यावर्षाची तुलनेत यंदा कारवाईचे प्रमाण घटलेले आहे. सर्वाधिक कारवाई होणाऱ्या पोलिस विभागावरील ट्रॅप थोडा ढिला झालेला आहे. त्यामुळे एसीबीच्या कार्यपद्धतीवर संशयाचे मळभ पसरले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जरब कमी झाला आहे. परिणामतः लाच घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच दिल्याशिवाय काम केल्या जात नाही. फाइल अडकवून ठेवण्याचे प्रकार सर्रास सुरू असून सामान्य नागरिक शासकीय कामकाजाच्या पद्धतीला कंटाळले आहे. 

दुसरीकडेे मात्र एसीबी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मरगळ आल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या काळात सर्वच शासकीय कामे बंद होती. त्यामुळे लाचखोरांच्या खिशाला झळ बसली. कमाई न झाल्यामुळे अनेक लाचखोर कर्मचारी-लिपिक निराश झाले होते. आता शासकीय कामकाज पूर्ववत सुरू झाल्यामुळे लाचखोरांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्यामुळे मिळेल त्याच्याकडून लाच खाण्याचा धडाका सुरू झाला आहे. 

यावर्षी नागपूर परिक्षेत्रात ९ सापळे रचल्या गेले आहेत तर पुण्यात १८, नाशिकमध्ये १४ तर औरंगाबादमध्ये ११ सापळे रचण्यात आले आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत ७६ सापळे करण्यात आहे होते तर १०९ आरोपींना अटक करण्यात आली होती. तर यावर्षी मात्र ७२ सापळे रचण्यात आले असून १०० लाचखोर आरोपींना अटक करण्यात आली.

प्रसिद्धीची वाणवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जनजागृती करण्यास मागे पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यापर्यत कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्यास कोणाकडे तक्रार करायची याबद्दल माहिती नसते. तसेच तक्रार कुठे तक्रार करावी? कशी करावी? इत्यादी बद्दल जनजागृती होत नसल्याने अनेकजण लाच देऊन काम करून घेतात. त्यामुळे नागरिकांच्या जनजागृतीसाठी शासकीय कार्यालयात बॅनर, पोस्टर्स किंवा भित्तिपत्रक लावायला पाहिजे.

ट्रॅप फेलची चर्चा

पोलिस दलातील एका ‘थ्री स्टार’ अधिकाऱ्यावर एसीबी ट्रॅप लावण्यात आला होता. मात्र, वेळीच टीप मिळाल्यामुळे तो ट्रॅप फेल झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात एक ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली होती. ट्रॅप फेल झाल्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा संशय बळावला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com