ग्रामीण अर्थव्यवस्था व विकास शासनयंत्रणा निर्णय, निसर्ग सहकार्य व शेतकऱ्यांच्या स्थिवर अवलंबून आहे. बदलत्या काळानुरूप व गरज लक्षात घेता शासनाने ग्रामीण व्यवस्था व कृषी संबंधित अनेक सुविधा व योजना देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अद्यापही शेतकरीवर्ग व व्यवस्था समाधानकारक अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येत नाही.
ज्याप्रमाणे कोणतेही शासन उद्योगांना विकासासाठी अग्रक्रम देते, कर्ज व इतर सुविधा उत्साहाने देण्याची व्यवस्था करते, तेवढा उत्साह व अग्रक्रम कृषी व ग्रामीण विकासासाठी देत असल्याचे दिसून येत नाही. उद्योग अडचणीत सापडले तर सरकार व बॅंक ज्या तत्परतेने मदतीला धावते, त्या तुलनेत शेती व ग्रामीण विकास अडचणीच्या वेळेवर होत नाही, असा आक्षेप कायम दिसून येतो. मोठ्या प्रमाणत कृषी विद्यालय, महाविद्यालयाचे शिक्षण प्रशिक्षणाचा नेमका उपयोग किती व कसा होत आहे हे तपासण्याची गरज दिसून येत आहे. येत्या अर्थसंकल्पात शासनाने ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा व कृषी विकासासाठी काही काळानुरूप गरज व धोरण प्रस्तुत करण्याची अपेक्षा व्यक्त करणे सुचवाव्याचे वाटते, असे प्रा. डॉ. सुभाष खाकसे म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.