तीन दिवसांपासून बेपत्ता होता शेतकरी; विहिरीतील पाणी काढताच दिसलं भयंकर दृश्य  

abv
abv

कोंढाळी (जि. नागपूर) :  येथून १३ किलोमीटर अंतरावरील चंदनपार्डी येथील शेतकरी सुरतराम मैफत खवसे (वय५५) यांनी मागील सततच्या नापिकीमुळे शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यांनी नापिकी व बँकेच्या कर्जापायी आत्महत्या केल्याची तक्रार कोंढाळी पोलिस ठाण्यात दिल्याची माहिती आहे. 

प्राप्त माहितीनुसार सुरतराम खवसे हे काही दिवसांपासून सततच्या नापिकी व बँकेच्या कर्जामुळे कंटाळले होते. त्यांनी ३ फेब्रुवारीला यावर्षीचे शेतात पिकविलेले सोयाबीनचे दोन कट्टे विकण्याकरिता कोंढाळी येथे आणले. तेव्हापासून ते परत घरीच आले नाही. त्यामुळे नातेवाईकानी त्यांचा ४ तारखेपासून परिसरात व जंगलात शोध घेतला. परंतु शोध लागला नाही. म्हणून सुरतराम यांच्या शेतातील विहिरीत शोध घेतला. तिथेही काहीच आढळले नाही. 

मोटरपंप लावून विहिरीतील पाणी खाली केले असता सुरतराम खवसेचा मृतदेह दिसून आला. पोलिस पाटील उमेश खवसे यांनी कोंढाळी पोलिसांना विहिरीत मृतदेह असल्याची माहिती दिली. ठाणेदार विश्वास पुल्लरवार, हेड काँस्टेबल सुनील बन्सोड, गौरव मोकळेंसह पोलिस घटनास्थळी पोहचले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढून त्याची ओळख झाली. 

पंचनामा करून मृतदेह काटोल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता पाठविण्यात आला. त्यांच्या पत्नीने पती सुरतराम यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार दिली. ठाणेदार विश्वास पुल्लरवार हे घटनेचा तपास करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com