नागपूर : शाळेतील उपस्थिती वाढविण्यासोबतच सुदृढ आरोग्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविली जाते. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी ४.४८ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज ६.७१ रुपयांचे धान्य वाट्याला येते. एवढ्या कमी पैशात पोषण होणार कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सुरुवातीला या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा तीन रुपये किलोप्रमाणे मोफत तांदूळ घरपोच दिला जात होता. २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे, असे आदेश दिले. त्यानंतर २००२ पासून या योजनेचे स्वरूप बदलून विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेला आहार देणे सुरू झाले.
२००८ मध्ये या योजनेचा विस्तार करून इयत्ता सहावी ते आठवीचा समावेश करण्यात आला. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या व उपस्थिती वाढवून गळती थांबविण्याचा उद्देश होता. सरकारी शाळांधील संख्या पाहता यात फारसे यश आल्याचे दिसत नाही.
धोरण तयार करणाऱ्यांची मुले याच्या पेक्षा जास्त रुपयांच्या अन्नाची नासाडी करीत असतील. केंद्र सरकारकडून मोफत तांदूळ प्राप्त होतो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ७५ टक्के व राज्य सरकारकडून २५ टक्के निधी प्राप्त होतो.
असा मिळतो आहार
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.