डोलणारी पिके अचानक झाली मातीमोल, काय झाले असे...

 मेंढला :  शेतकरी ज्ञानेश्‍वर चरपे यांच्या शेतात साचलेले पुराचे पाणी.
मेंढला : शेतकरी ज्ञानेश्‍वर चरपे यांच्या शेतात साचलेले पुराचे पाणी.

नागपूर ग्रामीण :  जिल्हयात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने कहरच केला. अनेक शेतक-यांची पिके पाण्याखाली असल्याने शेतक-यांचे बरेचशे नुकसान झाले. हिंगणा व नरखेड तालुक्‍यात पाण्याने शेतातील पिके अक्षरशः वाहून गेली.

अधिक वाचा :   कोरोनासे नही क्‍वारंटाईनसे डर लगता है साहाब, काय आहे कारण...

जलयुक्‍त झाले शिवार, मात्र पिके खवार
नरखेड तालुक्‍यात मंगळवारच्या मध्यरात्री तीन वाजता झालेल्या जोरदार पावसामुळे रामपुरी, चांदणीबर्डी व मेंढला येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मेंढला येथील शेतकरी ज्ञानेश्वर श्रावण चरपे यांच्या शेताला लागूनच नाला आहे. मागील सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. पण, कुठे या जलयुक्त शिवार योजनेला फक्त लिपापोती करण्यात आली आहे. तसाच प्रकार मेंढला येथे घडला. पावसामुळे दोन एकर शेतातील कपाशी दबून गेली. उसनवारी पैसे घेऊन पुन्हा कपाशीची लागवड केली. कपाशीचे पीक डौलदार होताच जलयुक्त शिवाराच्या भोंगळ कामाने चक्क शेतकऱ्याची कपाशी, शेतातील माती संपूर्ण वाहून गेली आहे. शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करीत आहेत.

येरणगावात पिके बरबाद
हिंगणा एमआयडीसी : हिंगणा ते वर्धा राज्य महामार्गावरील येरणगाव येथे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी शेतीत जमा झाले. यात शेतक-याच्या लाखो रूपयाच्या पिकाचे नुकसान होवून शेतकरी हवालदिल झाला.येरणगाव येथील सुरेश उईके या आदिवासी शेतक-याने इकडून तिकडून पैसा जमा करुन तीन एकर शेतात कापूस, वाल, चौरा आदी पिकांची लागवड केली. खतही दिले. रोपे डोलत असताना मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. बाजूलाच पुलाचे बांधकाम सुरु आहे. बाधंकामाची सामुग्री रस्त्यावर पडून असल्याने नाल्याचे पाणी वाहुन जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आणि पाणी बाजूच्या शेतात जमा झाले. या गरीब शेतकरी लाखो रूपये यात बरबाद झाले.पावसाळ्यात रस्त्यावर कामे सुरु असताना अनेक उपाययोजना कराव्या लागतात. बांधकाम विभाग, ठेकेदार कुणाचीही पर्वा न करता अशी कामे करतात. पावसाळ्यात पाउस येणार मग हे पाणी वाहत कसे जाणार, याचा विचार केला तर अशा प्रकारचे नुकसान टळू शकते. या नुकसानीची दखल बांधकाम विभागाने तात्काळ घ्यावी आणि शेतक-याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करित आहेत. जर मोबदला मिळाला नाही तर "काम रोको' आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अधिक वाचा :  "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...

नुकसानभरपाई द्या !
ठेकेदाराने या नाल्याचे खोलीकरण ज्या प्रमाणात करायला पाहिजे होते तसे केले नाही. त्याचा फटका
मंगळवारी झालेल्या पावसामुळे नाल्याचे पाणी माझ्या शेतात शिरून माझ्या दोन एकर शेतातील कपाशी पूर्ण वाहून केली. तरी शासनाने मला नुकसानभरपाई द्यावी.
-ज्ञानेश्वर श्रावण चरपे
शेतकरी मेंढला
 
                                    संपादन : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com