जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यात सोमवारी (ता. १०) खळबळ उडविणारी घटना घडली. गावातील एका मुलीच्या आत्महत्येनंतर एका तरुणानेही आत्महत्या केली. ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची नरखेड तालुक्यात चर्चा असली तरी पोलिसांनी सध्या दुजोरा न देता तपासाअंती सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे अनेक गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरखेड तालुक्यातील महेंद्री येथील सतरा वर्षीय मुलीने रविवारी (ता. ९) तिच्या राहत्या घरी विष प्राशन केले होते. तिला प्रथम जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. परंतु, तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे नागपूरला हलविण्यात आले होते. नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच सोमवारी (ता. १०) तिचा औषधोपचारादरम्यान मृत्य झाला.
तिच्या मृत्यूची वार्ता समजताच जलालखेडा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या खुशालपूर येथील तरुण यश रवींद्र धोटे (वय २१) याने सोमवारी (ता. १०) भिष्णूर शिवारातील एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे या दोघांचे प्रेमप्रकरण होते. यातूनच आत्महत्या झाल्याच्या चर्चेला नरखेड तालुक्यात उत आला आहे.
यश धोटेने आत्महत्या केल्यानंतर गावात विविध चर्चेला सुरुवात झाली आहे. या दोघांचे प्रेम होते असेही नागरिक एकमेकांशी बोलत आहे. परंतु, पोलिसांनी याला दुजोरा न दिल्यामुळे या दोघांनी आत्महत्या का केली, या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास काही अवधी लागणार आहे. पण, या आत्महत्येमागील सत्य बाहेर येण्याची सर्वांना उत्सुकता आहे.
महेंद्री येथील सतरा वर्षीय युवती व खुशालपूर येथील एकवीस वर्षीय युवक हे दोघेही भारसिंगी येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. ते दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्यात प्रेमप्रकरण होते, असा संशय तालुक्यात व्यक्त करण्यात येत आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.