अतिवृष्टीमुळे ११ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Farmer
Farmer

नागपूर - जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ८ हजार ५८२ हेक्‍टरमधील ११ हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानच्या मदतीसाठी ९ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आला. 

३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेली शेती, शेतजमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु, दुरुस्त होणारी जमीन व खरडून गेलेल्या शेतीचा समावेश आहे. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र ७५१९.४५ हेक्‍टर आहे. यात ९,१६३ शेतकरी बाधित झाले आहेत. यात २८८८.०७ हेक्‍टरमध्ये सोयाबीनचे नुकसान झाले. तर कापसाचे ४४७४.८९ हेक्‍टर, धानाचे २३.५१ हेक्‍टर तर तुरीचे १३२.९८ हेक्‍टरवर नुकसान झाले. या नुकसानासाठी हेक्‍टरी ६,८०० रुपयेनुसार ५ कोटी ११ लाख ३२ हजार २६० रुपयांची मागणी करण्यात आली. तर १५.६७ हेक्‍टर शेतजमिनीवरील गाळ वाहून गेला. यामुळे ७३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना १२,२०० रुपये हेक्‍टरप्रमाणे १ लाख ९१ हजार १७४ रुपये अपेक्षित आहे. खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्र १०४५.८८ हेक्‍टर आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या २,०४८ असून, ३७,५०० रुपये हेक्‍टरी नुकसानासाठी ३ कोटी ९२ लाख २० हजार ५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत कृषी विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे किमान अतिवृष्टी काळात झालेल्या नुकसानाची मदत शासनाने लवकर द्यावी.
- विनोद पाटील, सदस्य, कृषी समिती, जि. प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com