यवतमाळमध्ये तब्बल दोन लाख नागरिकांना टंचाईच्या झळा; गावांत 26 टॅंकरने पाणीपुरवठा

representative Image
representative Image

यवतमाळ : उन्हाची तीव्रता (Summer season) वाढू लागल्याने पाणीटंचाई (Water Crisis) तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात टंचाईने डोके वर काढले आहे. सध्यास्थितीत दोन लाख नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. एकूण 26 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून, 115 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (2 lacs people affected due to water crisis in Yavatmal)

representative Image
'सांगा आम्ही पेपर द्यायचा कसा?; विद्यार्थ्यांचा सवाल

जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे टंचाईची तीव्रता कमी असली तरी ती आता जाणवू लागली आहे. जसजसा उन्हाळा तापणार तसतसे टंचाईचे चटके बसण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी टंचाई कायमच असते. या भागांतील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. यंदाही जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृतिआराखडा तयार केला आहे.

टंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे. यंदा पहिला टप्पा निरंक आहे. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्चदरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्यात टॅंकर व खासगी विहिरी अधिग्रहणाची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील 26 गावांना 41 फेऱ्यांच्या माध्यमातून 26 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकरद्वारे 35 हजार नागरिकांची तहान भागविली जात आहे. खासगी विहिरी अधिग्रहण 115वर पोहोचले आहे. एक लाख 67 हजार 842 जणांची तहान त्यातून भागविली जात आहे.

representative Image
दुर्दैवी! वाघाच्या हल्ल्यात एकाच दिवशी दोन महिला ठार; जंगलात जाताना बाळगा सावधानता

पुसद तालुक्‍यातील 18, आर्णी तालुक्‍यात तीन, यवतमाळ दोन, कळंब, केळापूर व बाभूळगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एका गावात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यंदाच्या आराखड्यात सर्वाधिक खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल 453 गावांना टंचाईचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. या गावांसाठी 453 उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, दोन कोटी 27 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंदा 589 गावांत पाणीटंचाईची शक्‍यता आहे. त्यासाठी 636 उपाययोजना राबविण्यात येणार असून, सात कोटी 80 लाख 33 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

(2 lacs people affected due to water crisis in Yavatmal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com