33 कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः राज्यात तीन वर्षांत 50 कोटी वृक्षलागवड मोहिमेतील अखेरच्या टप्प्यातील 33 कोटी वृक्षलागवडीची लक्ष्यांची पूर्तता पाच दिवसांपूर्वीच झाली आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात 92 लाख नऊ हजार 533 पर्यावरणप्रेमींनी सहभागी होऊन जनआंदोलन उभे केले.
राज्य शासनाने 2017 ते 2019 या चार वर्षांच्या कार्यकाळात 4 कोटी, 13 कोटी आणि 33 कोटीसह 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला होता. यंदा 33 कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंतची कालमर्यादा दिली होती. मात्र, 25 सप्टेंबरला दुपारी दोन वाजतापर्यंत 33 कोटी वृक्षलागवडीचे आव्हानात्मक लक्ष्य पूर्ण झाले आहे. तरीही ही मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. वन विभागाने 17 कोटी 36 लाख सहा हजार 533 रोपांची लागवड केली. वनेत्तर शासकीय व अशासकीय विभाग मिळवून 15 कोटी 65 लाख 24 हजार 725 रोपांची लागवड केली आहे. त्यात ग्रामपंचायतींनी 8 कोटी 28 लाख 80 हजार 661 रोपांची लागवड केली. रेशीम उद्योग विभागाने सर्वाधिक 2 कोटी 58 हजार 17 हजार 200 सर्वाधिक रोपे लावलीत. कृषी विभागाने 39 लाख 12 हजार 832 दुसऱ्या तर सार्वजनिक बांधकाम विभागाने तिसऱ्या क्रमांकाची रोपे लावली आहेत. राज्यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात एक कोटी 99 लाख पाच हजार 558 रोपे लावून पहिला क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांची वृक्षलागवड केली आहे.
वन विभागाने शिस्तबद्ध पद्धतीने केलेले नियोजन, सातत्याने ठेवण्यात आलेले संनियंत्रण, वनेत्तर शासकीय संस्था, अशासकीय संस्था, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, धार्मिक संस्था व सामाजिक संस्थांच्या सहभागामुळेच 50 कोटी वृक्षलागवडीचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com