शेतकऱ्यांचे जगणे मान्य करा

वरुड ः मकरंद अनासपुरे यांचा सत्कार करताना डॉ. अनिल बोंडे व अन्य मान्यवर.
वरुड ः मकरंद अनासपुरे यांचा सत्कार करताना डॉ. अनिल बोंडे व अन्य मान्यवर.

वरुड (जि. अमरावती) : शेतकऱ्यांनी व्यावसायिक झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नसून, त्यांना अडविणारे जाचक कायदे बंद केले पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. शेतकऱ्यांचे जगणे मान्य करा, अन्यथा निसर्गही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असे परखड वक्तव्य प्रख्यात सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
वरुड येथे आयोजित राष्ट्रीय कृषी विकास परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार डॉ. अनिल बोंडे, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे, डॉ. वसुधा बोंडे, नगराध्यक्ष स्वाती आंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ हा शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ही खंत असून ती बदलली पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याशिवाय शेती समृद्ध होणार नाही. शेतकरी जगणे महत्त्वाचे असून लोकांच्या मागे लागू नका जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा, असे आवाहन भारत गणेशपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमोल कोहळे व उज्ज्वला खोरगडे, प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे तर आभार डॉ. वसुधा बोंडे यांनी मानले.

शेतकऱ्यांना उच्च प्रतीची रोपे मिळणार
दुष्काळ सहन करणारे पिके शेतकऱ्यांनी घ्यावी, उत्पादन खर्चावर 50 टक्‍के नफा मिळाला तरच शेतकरी जगेल, यासाठी आम्ही प्रयत्न केला व 2022 पर्यंत उत्पन्न दुपटीचे धोरण तयार केले आहे. जगातल्या चांगल्या रोपांच्या आयातीच्या कायद्यात बदल होणार असून शेतकऱ्यांना उच्च प्रतीची रोपे मिळणार असल्याचे राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com