Amravati Cleanliness Crisis
esakal
अमरावती : महानगरातील साफसफाई व स्वच्छतेच्या कामाचे नियोजन पुर्णतः फसले आहे. जुन्या कंत्राटदारांना बाद करीत नविन कंत्राटदार नियुक्त करण्याच्या मनपा प्रशासनाच्या प्रक्रियेला खिळ बसली आहे. पाचही झोनमधील स्वच्छतेच्या कामासाठी पुरेशी यंत्रणा कंत्राटदार उभी करू न शकल्याने बोजवारा उडाला असून जागोजागी कचऱ्याचे ढीगारे साचू लागले आहेत. या मुद्दयावर सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनीही आता आपल्या तलवारी म्यान केल्याने संशयाचे वलय निर्माण झाले आहे.