अमरावती - संभाजी भिडे नावाची व्यक्ती शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून कायम वाट्टेल ते बरळते, इतिहासाची तोडफोड करून युवकांमध्ये संभ्रम निर्माण करून दोन समाजात तेढ निर्माण करून व युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करते.
मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही करत नाही, त्यांना पूर्णपणे मुभा देते. त्यामुळेच संभाजी भिडेंचे बोलविते धनी कोण आणि त्यांना अभय कुणाचे असा सवाल आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज २८ जुलै रोजी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
संभाजी भिडेंनी आजवर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण त्यांच्यावर कधीच कोणती कार्यवाही होत नाही, याचे रहस्य काय? या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरताना त्या म्हणाल्या की, काल २७ जुलै रोजी संभाजी भिडे शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी अमरावतीला आले होते.
त्यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली, इतकेच नव्हे तर ज्या महात्मा गांधींनी देश स्वातंत्र्याच्या लढ्यात अमुल्य योगदान दिले, ज्यांना राष्ट्रपिता म्हटल्या जाते त्या महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त टिपणी केली. ते कायम जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करून समाजात विष कालविण्याचे काम करतात, युवकांची माथी भडकवितात.
परंतु राज्याचे गृहमंत्री त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही करत नाही, याचा अर्थ काय? असा सवाल त्यांनी केला. यापुढे जर संभाजी भिडे यांनी असे वक्तव्य केले, तर त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा त्यांनी दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.