

Parbhani News
esakal
परभणी: शहरातील ऑटो रिक्षाचालकांनी सर्रास मनमानी करत किमान भाडे २० रुपयांवरून थेट ३० रुपयांपर्यंत वाढवले आहे. एलपीजी दरवाढीचा आधार घेत प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. एलपीजी दरवाढ झाली असली तरी त्याचा इतका मोठा भार थेट प्रवाशांवर टाकणे अन्यायकारक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.