एकेकाळी हसते खेळते असलेले आमचे नगर आज विरान आहे, साहेबऽऽ

एकेकाळी हसते खेळते असलेले आमचे नगर आज विरान आहे, साहेबऽऽ

वाशीम : मालेगाव तालुक्यात दोन दिवस मुक्काम केल्यानंतर सकाळीच रिसोड गाठले. दिलेल्या पत्त्यावर केशवनगरला पोहोचलो. येथील बस स्थानकावर ‘सकाळ’चे रिसोड तालुका बातमीदार प्रभाकर पाटील यांनी स्वागत केले. त्यांच्यासोबत रूपेश बाजड, केशवनगरचे उपसरपंच गजानन बाजड हेसुद्धा होते. एकेकाळी हसते खेळते असलेले आमचे नगर आज विरान आहे साहेब, असे सांगत उभयतांनी बालाजी कारखान्याचा (Balaji Factory) कोसळलेला पटच डोळ्यांसमोर उभा केला. याच कारखान्यावर शेतकरीही अवलंबून असल्याने कारखाना सुरू झाल्यास सर्वांसाठीच सोईचे होते, असेही त्यांनी सांगितले. मग आम्ही निघालो बंद कारखान्याकडे. (Balaji Cooperative Sugar Factory was destroyed by the defenders)

सर्वप्रथम बालाजी सहकारी साखर कारखान्याची पाहणी केली. कारखान्याच्या परिसरात व रस्त्याच्या कडेला सर्वत्र काटेरी झाडेझुडपे वाढलेली दिसली. यामुळे परिसरातील रस्त्यांवरून धड चालताही येत नव्हते. बगीच्याची नासधूस केलेली दिसून आली. धरणाच्या बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झालेली आहे. काही निवासस्थानांना दरवाजे व खिडक्याही नाहीत. काही ठिकाणी वृक्षतोडही झाली असून, तेथे सुरक्षारक्षकांचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले.

एकेकाळी हसते खेळते असलेले आमचे नगर आज विरान आहे, साहेबऽऽ
राज्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही; या मंत्र्याने केले साथ देण्याचे आवाहन

दिवंगत बाबासाहेब धाबेकर यांच्या संकल्पनेतून १९८१-८२ साली सहकारातून वैनगंगेच्या काठावर मसला या ठिकाणी बालाजी साखर कारखान्याची पायाभरणी झाली. कारखान्याकडे ३६० एकर जमीन आहे. १९८८-८९ मध्ये पहिले गाळप सुरू झाले. कारखान्याचे गाळप सुरू होताच तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेकडो एकरवर उसाची लागवड केली. २००१ पर्यंत सर्वकाही सुरळीत होते; परंतु २००२ मध्ये माशी शिंकली कुठे, हे आजपर्यंत कळायला मार्ग नाही.

ऊसतोड कामगारांचाही रोजगार गेला

अचानक बंद झालेला हा कारखाना सुरू असता तर आज रिसोड तालुक्याचा संपूर्ण कायापालट झाला असता. शेतकरी सुखी, समाधानी होऊन या भागात समृद्धी नांदत असती. २,१०० रुपये शेअर असलेल्या या कारखान्याचे पाच हजार भागधारक आहेत. अंतर्गत राजकारणामुळे कारखान्याला २००२ मध्ये उतरती कळा लागून कारखाना बंद झाला. त्यामुळे ७५० कर्मचारी व त्यांचे कुटुंब शेकडो ऊसतोड कामगार यांचा रोजगार हिरावला गेला.

संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे उतरती कळा

‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, ही म्हण बालाजी सहकारी साखर करखान्याच्या बाबतीत खोटी ठरली. त्यावेळी या कारखान्याचे तब्बल सतरा संचालक होते. काही दिवसांतच गाळपाच्या बाबतीत हा कारखाना महाराष्ट्रात नंबर एक वर पोहोचला. परंतु, याच ठिकाणी कुठेतरी माशी शिंकली आणि संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यात गटबाजी झाली. दिवंगत बाबासाहेब धाबेकर व दिवंगत पुंडलिकराव गवळी यांचे वाद विकोपाला गेल्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला आहे. दरम्यान तत्कालीन अध्यक्ष सहसंचालकांचे कारखान्याकडे दुर्लक्ष झाले आणि बघता बघता लाखोंचा उद्योग बुडाला.

एकेकाळी हसते खेळते असलेले आमचे नगर आज विरान आहे, साहेबऽऽ
म्युकरमायकोसिसचा आढावा; २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवण्याची सूचना

‘महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह’चा ताबा

त्यावेळी आजच्या एवढी सिंचनाची सुविधा नव्हती. तरी शेतकरी मोठ्या कष्टाने उसाची लागवड करीत होते. कारखान्याची गाळप क्षमता जास्त असल्याने दूरवरून ऊस आणावा लागत होता. त्यामुळे वाहतुकीचा खर्च, उसाचा येणारा उतारा यामध्ये फरक पडत होता. त्यातच एकूणच कारखान्याच्या तांत्रिक अडचणीत वाढ होत गेली व कारखाना डबघाईस आला. आज या कारखान्यावर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज आहे. आज हा कारखाना बँकेच्या ताब्यात असून, साई ग्रुपच्या नियंत्रणात आहे.

बालाजी सहकारी साखर कारखाना तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक वैभव होते. आज सिंचनाची सुविधाही पूर्वीपेक्षा वाढली आहे. कारखाना सुरू झाल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतील. ज्या संकल्पनेतून दिवंगत बाबासाहेब धाबेकर व तत्कालीन संचालक मंडळांनी या कारखान्याची उभारणी केली ती पूर्ण होईल. कारखाना सुरू झाल्यास या परिसराला गतवैभव प्राप्त होईल.
- अमित झनक, आमदार, रिसोड विधानसभा मतदारसंघ
अल्पावधीतच कारखाना भरभराटीस आला. गाळपाच्या बाबतीतही महाराष्ट्रात नंबर एक वर गेला. तरी तेव्हा आजच्या एवढी सिंचनाची सुविधा नव्हती. दूरवरून ऊस आणावा लागत होता. आता कारखान्याचा खर्चही वाढला आहे. मध्यंतरी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. तत्कालीन संचालक मंडळाचे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. पुन्हा कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा कायापालट होईल. तसेच बेरोजगारांना रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.
- बाबाराव पाटील खडसे, संचालक बालाजी साखर कारखाना, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

(Balaji Cooperative Sugar Factory was destroyed by the defenders)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com