गांधी भक्तीच्या ढोंगापासून सावध रहा : तुषार गांधी

Tushar Gandhi
Tushar Gandhi

चंद्रपूर : महात्मा गांधींबाबत समाजात जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्याचे काम काही संघटनांच्या माध्यमातून सुरू आहे. महात्मा गांधींना जात-धर्म नव्हे तर माणूस महत्त्वाचा होता. मात्र, समाजात विद्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्यांकडून आता गांधी भक्तीचे ढोंग केले जात आहे. त्यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
लोकयात्रा बहुउद्देशीय संस्था खुटाळा आणि डॉ. जया द्वादशीवार ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यातर्फे रविवारी (ता.13) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित "गांधी समज -गैरसमज' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार तर मंचावर लेखिका अरुणा सबाने, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत साव उपस्थित होते.
महात्मा गांधीजींनी मुस्लीम तुष्टीकरण आणि धर्माचे राजकारण कधीच केले नाही. त्यांच्यासाठी माणूस महत्त्वाचा होता. भारत-पाकिस्तान फाळणीप्रसंगी पाकिस्तानला दिलेले 55 कोटी, पुणे करार आणि हिंदूंच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष, अशी खोटी कारणे सांगून गांधीजींना लक्ष्य केले जाते. गांधींजींवर केलेल्या या चारही आरोपात तथ्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभेसारख्या संघटनांच्या संकुचित हिंदू राष्ट्रवादासाठी गांधींची वैश्विक भूमिका आड येत असल्याने ऐतिहासिक सत्य लपवून ते देशात तिरस्कार पसरवितात. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद होते, पण वैमनस्य नव्हते. राष्ट्रीय एकात्मतेला नख लावणाऱ्या संघटना स्वार्थासाठी शत्रुत्व उभे करतात आणि गोडवेही गातात. यापासून नवीन पिढीने सावध राहून गांधी विचार समाजात रूजवला पाहिजे, असे मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com