Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, आता निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री फडणवीस यांचा अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांच्या प्रतिपत्रावर जुन्या तारखेचाच शिक्का असल्याचे सांगितले जात होते. 

त्यामुळे डॉ. आशिष देशमुख आणि प्रशांत पवार यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यावर तहसील कार्यालयात सुनावणी झाली. त्यानंतर हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा अर्ज वैध असल्याचा निर्णय देण्यात आला. 

Vidhan Sabha 2019 : उर्मिला मातोंडकर काँग्रेसचा प्रचार करणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com