दुधाळ जनावरांना फटका; हिरव्या चाऱ्या अभावी दुग्धोत्पादनात घट

दुधाळ जनावरांना फटका; हिरव्या चाऱ्या अभावी दुग्धोत्पादनात घट

अकोला: दुष्काळाची दाहकता मे महिन्यात जास्त जाणवू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबर दुष्काळाचा वऱ्हाडातील 19 लाख 05 हजार 818 पशुधनाला फटका बसत आहे. प्रथिनेयुक्त खाद्य व हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाऱ्यावर जनावरांची भूक भागवावी लागत आहे. याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत असल्याने दुग्धोत्पादनात घट झाली आहे.

दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या तीन जिल्ह्यातील 19 लाख 05 हजार 818 दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे. परिणामी, दुग्धोत्पादनाला फटका बसत आहे.

दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढविण्यासाठी मोठा फायदा होतो. त्यामध्ये प्रथिने युक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर पशुधन पालकांना परवडणारे नाहीत. बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ तीव्र स्वरुपाचा असल्याने याचा फटका पशुधनालाही अधिक बसत आहे.

दुष्काळी परिस्थितीत लहान पशुधनाला प्रतीदिवस 20 लिटर साधारणपणे पिण्यास पाणी, तर 3 किलो चारा तर मोठ्या पशुनाला 40 लिटर पाणी अन् 6 किलो चारा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी विहीर, बोअरचे पाणी आटल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे. यामुळे दुधाळ पशुधनाची भूक सोयाबीन, तूर, हरभरा या वाळलेल्या चाऱ्यावरच भागवावी लागत आहे. किरकोळ ठिकाणीच हिरवा मका, बहूवार्षिक थोंब्याचा चारा पशुधनाला टाकला आहे. सध्या वाळलेल्या चाराच पशुधनासाठी वरदान ठरत आहे. पशुधनाची भूक वाळलेल्या चाऱ्यावर काही दिवस भागू शकेल एवढी तरतूद असली तरी हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन 10 टक्के घटले आहे.

पशुधनाची संख्या 19वी पशुगणना 2012 नुसार
जिल्हा      पशुधन संख्या
अकोला --  4 लाख 65 हजार 913
बुलडाणा --  9 लाख 80 हजार 876
वाशीम --   4 लाख 59 हजार 029
एकूण --    19 लाख 05 हजार 818

राज्यात दोन हजार हेक्टर गाळपेर क्षेत्र
दुष्काळ जाहीर केलेल्या भागात 1 कोटी 80 लाख पशुधन आहे. या भागासाठी 116.27 लाख मे.टन चाऱ्याची आवश्यकता भासणार असल्याचे लक्षात घेत चारा उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. याकरिता जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनविकास, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना आदींमधून चारा उत्पादनासाठी राज्यभरातून सुमारे 2 हजार हेक्टर गाळपेर क्षेत्र शोधून त्यावर चारा उत्पादन घेण्यासाठी बियाणे वाटप केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com