Sharad Pawar : मजबूत राष्ट्रासाठी मोदींचा पराभव गरजेचा

अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार बोलत होते.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

अमरावती - आज भारताच्या शेजारील राष्ट्रांची परिस्थिती अतिशय विदारक झालेली आहे. तेथील राज्यघटना कमकुवत पडल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून डॉ. बाबााहेब आंबेडकर यांच्या संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न होत असून संविधान वाचविण्यासाठी तसेच भारताला मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी मोदींचा पराभव आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज (ता.२२) अमरावती येथे केले.

अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार मुजफ्फर हुसैन, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, उमेदवार बळवंत वानखडे, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, महानगर प्रमुख पराग गुडधे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष लक्ष्मी शर्मा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, किशोर बोरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मागील दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशात तुमची सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही देशासाठी काय केले ते सांगण्याची गरज असताना तुम्ही मात्र काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, असा प्रश्न उपस्थित करून देशातील जनतेची फसवणूक करीत आहात, असे श्री. पवार म्हणाले.

देशातील संसदीय लोकशाही धोक्यात आली असून देशातील विद्यमान सरकारचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन क्षीप्रा मानकर यांनी, तर प्रास्ताविक आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले.

एकदा चूक केली

मागील वेळी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्याच्या खासदारांना मते देण्याचे आवाहन करून मोठी घोडचूक केली होती, त्याचे परिणाम आजही दिसून येत आहेत. त्यामुळे ही चूक सुधारण्यासाठी आता आपण येथे आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अशी चूक परत होणार नाही, असेही ते म्हणाले.

आणीबाणीनंतर पहिल्यांदाच देशात सरकारविरोधी लाट

देशात पहिल्यांदाच सरकारविरोधात मोठी असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. आणीबाणीनंतर ज्याप्रमाणे देशात सरकारविरोधात लाट होती तशीच परिस्थिती आज देशात आहे. मोदींची गॅरण्टी ही विकासाची नसून भ्रष्टाचाऱ्यांना अभय देणारी आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मोदी सरकारकडून संविधान बदलविण्याच्या हालचाली सुरू असून आम्ही तसे होऊ देणार नाही. ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही, अशी असून लोकशाही वाचविण्यासाठी देशातील जनतेने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील नागरिकांना मोफत धान्य नको तर रोजगार हवा आहे. त्यांच्या भूलथापांना तिलांजली देण्याची ही वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com