धामचा मृतसाठा यंत्राने उपसणार

file photo
file photo

वर्धा : शहरात कधी नव्हे एवढी पाणीटंचाई यंदा निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न असले तरी धरणातील जलसाठा संपला असून आता वापरण्यात येत असलेला पाण्याचा मृतसाठाही खाली गेला आहे. हा साठा यंत्राच्या सहाय्याने एकाठिकाणी उपसून तो सोडण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू आहे. यातून शहरवासीयांना येत्या 31 जुलैपर्यंत पाणीपुरविण्याचे नियोजन आहे.
धरणात असलेला जलसाठा हा पाणी सोडण्याच्या गेटखाली आला आहे. यामुळे तो सोडणे शक्‍य नाही. शहरात नागरिकांना पाण्यासाठी होत असलेल्या भटकंतीची पालिका प्रशासनाला माहिती आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. काही भागात समाजसेवींकडून पाण्याचे टॅंकर पुरविण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे. पालिकेकडून नागरिकांना पाऊस येईपर्यंत पाणी पुरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरात असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्याकरिता लोकप्रतिनिधींकडून विशेष प्रयत्न करण्यात येत नसल्याची खंत पालिकेच्या वतीने व्यक्‍त करण्यात येत आहे. पालिकेकडून होत असलेल्या या प्रयत्नातून यश आल्यास त्याचा लाभ शहरातील नागरिकांसह 13 गावातील नागरिकांनाही होणार आहे. यामुळे या कामाकरिता सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा पालिकेच्या वतीने व्यक्‍त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com