धान्य खरेदी केंद्र नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे नूकसान

धान्य खरेदी केंद्र नसल्यामुळे व्यापाऱ्यांचे नूकसान

संग्रामपूर : शासनाकडून धान्य खरेदीसाठी संग्रामपूर खरेदी विक्री संस्थेलाच मान्यता देण्याबाबतचा निर्णय दोन चार दिवसात होणार आहे. आतापर्यत केंद्र घेण्याबाबत एकाही संस्थेकडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आलेला नसल्याने केंद्र सुरू होण्यास विलंब होत आहे. अशी माहीती जिल्हा मार्केटिंग अधिकारी पंढरीनाथ शिंगणे यांनी मंगळवारी (ता.30 ऑक्टोबर) 'सकाळ'शी बोलताना दिली. सोबतच संग्रामपूर खरेदी विक्री ब्लॅक लिस्ट मधून बाहेरकाढण्या सदर्भात मुबंई वरून कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्या पाच व्यापारी लोकांविरुद्धचा एफआयआर रद्द चा आधार संस्थेच्या हिताचा ठरणार हे यावरून दिसत आहे. सन 2016- 2017 मध्ये तूर खरेदी मध्ये गडबड झाल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार डीडी आर याचा चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्या अहवाला नुसार सहाय्यक निबंधक जळगाव जा यांनी शेतकरी सहकारी संस्था अध्यक्ष, व्यवस्थापक, संचालक आणि व्यापारी यांच्या विरुद्ध तामगाव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केले.  पोलिसांनी गुन्हे दाखल करून चौकशी सुरू केली. सदर प्रकरणात हेतुपुरस्सर पणे संस्थेला गोवण्यात येत असल्याची बाजू घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱयांनी विभागीय सह निबंधक अमरावती यांच्याकडे धाव घेतली. सह निबंधक यांनी या प्रकरणातील सर्व कागदपत्रांची तपासणी करून ज्या चौकशी अहवालाचे भरवशावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तोच अहवाल रद्द ठरवल्याचा निर्णय 15 मे 2018 ला दिला. या निर्णयामुळे संस्थे विरुद्ध तक्रार ढिली पडली. त्यानंतर या गुन्ह्यातील पाच व्यापारी लोकांनी त्याचे विरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्या बाबत नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामध्ये सदर एफआयआर रद्द करण्याचा निर्णय देण्यात आला. 

असे सुरू असताना यंदा शासनाकडून ज्या खरेदी केंद्रावर गोंधळामुळे तक्रारी झाल्या अशा संस्थाना हमी भावाने खरेदी करण्याची मान्यता देऊ नये असा निर्णय घेऊन अशा संस्था ब्लॅक लिस्ट मध्ये टाकल्या. म्हणून संग्रामपूर तालुक्यात शासनाची खरेदी सुरू होणार की नाही अशीच चर्चा होती. जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून जाहिरात द्वारा केंद्र घेण्याबाबत खाजगी संस्थाना ही आवाहन केले होते. मात्र ज्या 8 ते 10 खाजगी संस्था या तालुक्यात नोंदणीकृत आहेत त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या काहींचा समावेश आहे. एका संस्थेने तर शासनाचे खरेदी केंद्र सुरू असताना तूर खरेदी केलेली होती. मात्र तुरीच्या बाबतीत दाखल झालेल्या तक्रारी आणि गुन्हे पाहता एकानेही खरेदी केंद्र घेण्यासाठी हिम्मत दाखवून प्रस्ताव सादर केला नाही.

शासनाची खरेदी सुरू नसल्याने बाजारात खाजगी व्यापारी वर्गाला सोयाबीनची कमी भावात विक्री केल्याशिवाय शेतकरी वर्गाला पर्याय नाही अशी स्थिती निर्माण झाली. दिवाळीचा सण पाहता शेतकऱयांना आर्थिक झळ सहन करून धान्य विक्री करावे लागत आहे. जिल्हा मार्केटिंगकडे फक्त सुरवातीला संग्रामपूर खरेदी विक्री संस्थेचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. पण शासनाने ही संस्था ब्लॅक लिस्ट मध्ये टाकली असल्याने खरेदी केंद्रासाठी मान्यता देणे मार्केटींग अधिकारी यांना शक्य नसल्याने आतापर्यत ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली नाही. मात्र त्या पाच व्यापारी लोकांविरुद्धचा एफआयआर रद्द आणि तो अहवाल रद्द चा निर्णय घेऊन संस्थेची बाजू शासनाकडे भक्कम ठरली. म्हणून सदर संस्था ब्लॅक लिस्ट मधून काढण्याची कार्यवाही मुबंई वरून सुरू झाली असून येत्या तीन चार दिवसात या संस्थेला खरेदी बाबत ची मान्यता मिळण्याचा मार्ग सुकर, झाल्याची माहिती आहे.

केंद्र सुरू करण्यासंदर्भात मागणी नुसार एकाही संस्थेकडून जाहिरात काढल्यावरही परिपूर्ण कागद पत्रांसह प्रस्ताव देण्यात आलेला नाही. केवळ मागणी पत्र देऊन मान्यता दिली जात नाही. संग्रामपूर खरेदी विक्री संस्था ब्लॅक लिस्ट मधून काढण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच या संस्थेअंतर्गत शासनाची खरेदी सुरू होणार आहे. 
- पंढरीनाथ शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बुलढाणा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com