

Around 2,000 professors from 78 colleges in Maharashtra are still waiting for government grants despite fulfilling UGC norms.
Sakal
नागपूर : राज्यातील ७८ महाविद्यालये आणि सुमारे २ हजार प्राध्यापक गेल्या २५ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ४५५ दिवस प्रदीर्घ उपोषण करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी पावसाळी अधिवेशनात या गंभीर प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.